गोपाळचे शौर्य (7MAR4)
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले ‘मोहदी हे खेडेगाब. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून आठ- दहा किलोमीटर अंतरावर “कर्णागड’ नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी दररोजच तिथे जातात. सहल काढणारे, टेकिंगप्रेमी हेसुद्धा अधेमधे तिथे जाताना दिसतात.
गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला-पाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात.
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात ‘मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली.
“मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहचलेलं बरं!” असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले.
घाटातून गाडी जात असताना, मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. “अरे, तो बघा वणवा! वनवा लागलाय, वणवा!” गाडीतील एकजण ओरडला.
ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. नाहक आपण आगीत सापडू नये, हा त्याचा उद्देश होता. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदाबला. “गाडी थांबवा! ही आग विझवलीच पाहिजे.” चोदा वर्षांचा गोपाळ ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले.
“अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?” शिक्षक दरडावून म्हणाले; पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाइलाजाने गाडी थांबवावी लागली.
गोपाळने धाबतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे अडीच-तीन इंच परीघ असलेला तो लांबचलांब पाइप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता.
“ह्ये आग एकट्याकडून इझणार नाईच. हे मलेही माईत हाये, पन म्हनून काय परेतनंच करावं न्हाई का ‘काय? सर, असं जंगलंच आम्हां आदिवासींचे पोशिंदे हायेत. आनूं मायबापाले कोनी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय?” बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला.
गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, “माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना! सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे.” हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले.
एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील पन्नाशीचे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला आणि त्यांनी मोबाइल कानाला लावला. मोबाइलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाइप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती.
“गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे.” दुसर्या गाडीतील गृहस्थ म्हणाले.
“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच बाटतो.” शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले.
त्या गृहस्थाने फोनवरून अमिशामक दलाच्या दोन गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले.बीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अम्िशामकदलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचेच चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.
अशातच गाईवासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजबळ आले. त्यांतील एकजण हात जोडून म्हणाला, “लय बेस झालं बापा. आग इझली. गडावरचीतं कितीकंच झाडं-झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तं आम्हीही तसेच भाजून निघालो असतो. आनं आमच्यातं कोनाले पत्ता भी लागला नस्ता, तुम्ही समदं मदतीसं धावून आलेत” हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.
“खरंच, आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे.” असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते.
दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते.